Wednesday, October 16, 2024

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर


१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची

मुंबई (प्रतिनिधी): ‘कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात हिटलर भूमिकेत आहेत, ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी श्री प्रशांत दामले. तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्याने आता दुपटीने वाढली आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्रिकनंतर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी घेऊन येत असलेल्या “मु.पो. बोंबिलवाडी”मधील हिटलरच्या भूमिकेमध्ये कोण आहे, हा लाखमोलाचा प्रश्न रसिकांना पडला होता. हिटलरचा शोध घेण्यासाठी खरे तर प्रेक्षकांचा कल घेण्यात आला आणि त्याला भरघोष  प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते, प्रशांत दामले यांच्या नावावर.


‘कोण होणार हिटलर?’ या प्रश्नावरील पडदा लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्मस्, मयसभा करमणूक मंडळी यांनी बुधवारी हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उघडला आहे. चित्रपटाचे लेखन -दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.

हिटलरच्या भूमिकेबद्दल विचारले असता प्रशांत दामले म्हणाले, “मुळात हिटलर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक आकृती येते, प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. ते करायला मिळावे आणि परेश व मधुगंधाबरोबर करायला मिळावे हे महत्वाचे. परेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. दिग्दर्शक कसा असावा तर तो असा असावा. तो एक अप्रतिम दिग्दर्शक आहे.”

आजच्या मराठी चित्रपटांबद्दल विचारल्यावर दामले म्हणाले, “मराठी चित्रपटांबद्दल काही मला फार गती नाही, नाटकांबद्दल विचारले तर मी सांगू शकेन. मी फार कमी चित्रपट केले आहेत. दिग्दर्शक सांगेल तसे काम करणे ही माझी प्रकृती आणि वृत्ती आहे. कोरी पाटी घेवून बसले की काम करायला सोपे जाते. यात वैभव मांगले आहे, माझा लाडका दिग्दर्शक अद्वैत परळकर या चित्रपटात अभिनय करतो आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद हा चित्रपट करताना मिळतो आहे. नाटकातील सर्व मंडळी असल्याने नाटकाचेच चित्रीकरण करतोय की काय असा काय असा भास होतोय मला.”

चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “आम्ही आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले त्यानिमित्ताने जेव्हा आम्ही लोकांना प्रीमियर किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो तेव्हा लोक परेशला आवर्जून सांगायचे की, तुम्ही ‘बोंबीलवाडी’ नाटक परत आणा. माझेही हे आवडते नाटक आहे, कारण ती एक लाफ्टर राईड आहे. हळूहळू आम्ही जेव्हा याबाबत विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला असे वाटायला लागले की, या नाटकावर चित्रपट का आणू नये? मग आम्ही ठरवले की या संकल्पनेचे चित्रपटीकरण करून त्याचा चित्रपट करायचा. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर हे कसलेले कलाकार आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर राईड झाली आहे.”

हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, “आमचा हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरु होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे. पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर ‘क्युट’ असावा अशी एक टूम निघाली. आता क्युट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्युट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले. नाटकामधून या कथेचे चित्रपटात रुपांतर होताना जे बदल झाले, मग त्यात वयोगट आला, आज त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, याबद्दल चर्चा झाली. त्यातून मग कलाकारांची निवड झाली आणि ती चपखल आहे. त्यातून ही कलाकर मंडळी त्या त्या पात्रांमध्ये अगदी फिट्ट बसली आहेत, आणि ते तुम्ही पहालच.”

प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, “हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलर विचारावासा वाटतो, की ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात.”

चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे श्री भरत शितोळे म्हणाले, “फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की मराठी व हिंदी चित्रपट करायचे. पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा विषय सांगितला. कथा ऐकताचक्षणी मला वाटले की, विवेक फिल्म्सनी या चित्रपटानेच सुरुवात करायला हवी. त्यानिमित्ताने विवेक फिल्म्स आणि मयसभा एकत्र आलो. आम्हाला परेश मोकाशी व मधुगंधाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. बरेच काही शिकता आले त्यांच्याकडून. परेशजी हिटलरच्या भूमिकेमध्ये प्रशांत दामलेजीसाठी आग्रही होते. प्रशांत दामलेजी जेव्हा त्या गेटअप मध्ये आले तेव्हा वाटले की, परेशजींची व्हिजन बरोबर आहे. इतका परिपूर्ण आणि क्युट हिटलर दुसरा असूच शकत नाही. आम्ही यापुढेही एकत्र काम करत राहू.”

हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे.”

Sunday, October 13, 2024

लातूरचे चित्रकार अभिजीत बी. लामतुरे यांच्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन दि. १४ ते २० ऑक्टोबर, २०२४ दरम्यान, मुंबईच्या हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीत

 






मुंबई (प्रतिनिधी): शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील कोकळगांव येथील अभिजीत बी. लामतुरे या नवख्या चित्रकाराचे अमूर्त चित्राचे प्रदर्शन मुंबई येथील हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, मुंबई येथे दि. १४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर, २०२४ पर्यंत सकाळी ११ ते सायकाळी ७ या वेळेत सुरु रहाणार आहे. चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालीका लातूरच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र विद्यालय लातूर, चित्रकलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय लातूर तसेच भारती विद्यापीठ पुणे, अभिनव कला महाविद्यालय पुणे व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले. 

ज्याला अस्तित्व नाही, त्याची कल्पना करून कॅनव्हासवर चित्रात मांडणे म्हणजे 'अमूर्त कला" अशी व्याख्या करता येते. साधारणत: स्ट्रोक, शेप, संरचना रंगफार्म, उद्देश आणि समझ भिन्न असल्याने त्या चित्रांमध्ये दिसणारे अर्थ असंख्य असतात. मानवी बुद्धीला ज्ञात असलेल्या सर्व आकारांना काहीना काही संज्ञा आहेत. ब्रम्हांडाच्या अवकाशात असंख्य आकार दृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत. त्याची उत्पत्ती एका बिंदूपासून अनेक बिंदू एकत्र येवून झालेली आहे. याला संज्ञा नाही. म्हणून अमूर्त आहेत.

बिंदुपासून जन्माला येणारा महाप्रचंड तारा तुटतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा उत्सर्जीत करतो, तेव्हा त्याचे कृष्णवीवर तयार होते, हे कृष्णविवर म्हणजे भलामोठा बिंदूतून उत्पन्न झालेला अमूर्त आकार होय. चित्रकार अभिजीत बी. लातूर यांनी पृथ्वी, आप, तेज, वायु, आणि आकाश या पंचमहाभूतांनी - बनलेल्या सौंदर्यसृष्टीतल्या सर्व ज्ञात व अज्ञात आकाराच्या उत्पत्ती मागील मुळ गाभा असलेल्या बिंदूत्वाचा शोध चित्रांमध्ये घेऊन बिंदू, रेषा, आकार, रंग, पोत या पाच तत्वापासून नवनवीन प्रतिमाने निर्माण केलेली आहेत. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते, अकबर- पदमसी यांचा वसा व प्रेरणा घेवून चित्रकार अभिजीत लामतुरे यांनी ही अमूर्त चित्राकृती साकारली आहे. त्यांचे हे चित्रप्रदर्शन रसिकांना २० ऑक्टोबरपर्यन्त विनामूल्य पाहता येईल.

Saturday, August 24, 2024

एआईसी पिनेकल ने इवॉल्यूशनारी को लॉन्च किया: एक महिला केंद्रित कार्यक्रम जो महिला उद्यमियों को सशक्त बनाएगा।



मुंबई, 23 अगस्त, 2024 (AMN): -
एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम को इवॉल्युशनारी वूमन आंत्रप्रेन्योर्स प्रोग्राम लॉन्च करते हुए खुशी हो रही है। यह कार्यक्रम एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम की तरफ से महिलाओं की उद्यमशीलता की भावना को सशक्त बनाने और उसे पोषित करने के लिए डिजाइन की गई नई पहल है। एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम, भारत सरकार के अटल इनोवेशन मिशन (एआईएम)-नीति आयोग द्वारा समर्थित एक अग्रणी इनक्यूबेटर है।

पिनेकल इंडस्ट्रीज द्वारा 2023 में लॉन्च किया गया, इवॉल्युशनारी लैंगिक विविधता को प्रोत्साहित करने और एक समावेशी कार्यस्थल को बढ़ावा देने में सहायक रहा है। इस बहुआयामी कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं को उनकी करियर यात्रा के हर चरण में समर्थन देना, उन्हें वर्कफोर्स में फिर से प्रवेश करने, नए व्यावसायिक उद्यमों का पता लगाने और विभिन्न क्षेत्रों में अपने करियर को आगे बढ़ाने के अवसर प्रदान करना है।

इवॉल्यूशनारी की सफलता और सकारात्मक प्रभाव के आधार पर एआईसी-पिनेकल को विशेष रूप से महिला उद्यमियों के लिए अपनी स्वयं की समर्पित पहल की घोषणा करते हुए गर्व की अनुभूति हो रही है। इवॉल्यूशनारी महिला उद्यमी कार्यक्रम (डब्ल्यूईपी) एक 6 महीने लंबा इनक्यूबेशन कार्यक्रम है, जिसे महिला उद्यमियों को 10 महिला उद्यमियों के सावधानीपूर्वक तैयार किए गए समूह में शामिल होने का एक अनूठा अवसर प्रदान कर प्रोत्साहित करने और समर्थन करने के लिए तैयार किया गया है।

एआरएआई की पूर्व निदेशक रश्मी उर्ध्वेशे, रेलोफाई के सह-संस्थापक और सीटीओ ऋषभ सांघवी, एक्यूइटास टेककॉम के निदेशक डॉ. रिजवान पिंजरी समेत कुछ ऐसे मार्गदर्शक हैं जो महिला व्यापारिक लीडर्स को उनकी उद्यमशीलता यात्रा में मार्गदर्शन करेंगे।

एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम के सीईओ सुनील धाड़ीवाल ने कहा, "इस कार्यक्रम का लक्ष्य एक ऐसा विकसित माहौल तैयार करना है जहां महिलाएं उद्यमियों के रूप में उत्कृष्टता प्राप्त कर सकें, इनोवेट कर सकें और नेतृत्व कर सकें। हमारे पिछले समूहों के लिए, हमें विभिन्न क्षेत्रों में महिला उद्यमियों से आवेदन प्राप्त होते रहे हैं। महिला उद्यमियों का प्रतिशत बढ़ाने के लिए, इनक्यूबेटर का ध्यान पहले व्यवहार्य और नए विचारों को सामने लाने पर अधिक है। हमें विश्वास है कि अगर महिला उद्यमी ऐसे विचारों के साथ आती हैं, तो इन्क्यूबेशन प्रबंधकों, एक्सिलेरेटर्स प्रबंधकों और सलाहकारों की हमारी समर्पित टीम उन्हें व्यावसायीकरण करने में सहायता
===============================================

Tuesday, August 13, 2024

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे




- कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल

कर्जत, दि. १३ ऑगस्ट २०२४, वार्ताहर: कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी मंगळवारी (दि.१३) रोजी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन तीन ते चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक लावण्याबाबत आंदोलकांना शब्द दिला.

महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात कर्जत मधील सर्व सामान्य नागरिक आक्रमक झाला आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. भरमसाठ वीज बिल येत आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही समस्येचे निराकरण झाले नाही. त्यामुळे कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीने साखळी उपोषण सुरु केले आहे.
मंगळवारी सुधाकर घारे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत समस्या मार्गी लावण्याबाबत आपण पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला.

यावेळी सुधाकर घारे यांनी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी विनंती केल्याबद्दल संघर्ष समितीचे प्रमुख ऍड. कैलास मोरे साहेब यांनी घारे यांचे आभार मानले.

चौकट

घारे यांचा खासदार तटकरे यांना फोन

सुधाकर घारे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी महावितरणच्या तक्रारींचा पाढाच घारे यांच्यासमोर वाचला. यावेळी घारे यांनी तातडीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन या विषयाची सविस्तर माहिती देत उर्जा मंत्र्यांसोबत बैठक लावण्याची विनंती केली. खासदार तटकरे यांनी देखील उपोषणाची दखल घेत येत्या चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेऊन वीजेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शब्द दिला.

Thursday, August 1, 2024

कर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान - सुधाकर घारे यांचा उपक्रम; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन व कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ सुरु असून मंगळवारी (दि.३१) रोजी कर्जत येथील राजमुद्रा चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

कर्जत, 
१ ऑगस्ट, २०२४ (वार्ताहर):   गेल्या काही दिवसांपासून कर्जत-खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत, नेरळ आणि खोपोली या शहरांमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ अतंर्गत जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून, नागरिकांचा या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

सुधाकर भाऊ फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधाकर घारे यांनी कर्जत-खालापूर तालुक्यात सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ उपक्रम हाती घेतला आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात हे अभियान आता पूर्णत्वाकडे आले असून, कर्जत शहरात मंगळवारी (दि.३०) रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच नेरळ (ता. कर्जत) शहरात देखील सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

कर्जत खालापूर तालुक्यात सुधाकर घारे यांच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्यात कर्जत खालापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवते, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूव वाड्या वस्त्यांवर टॅँकरव्दारे पाणी पुरवठा, पावसाळ्यात नागरिकांना ताडपत्री वाटप, विद्यार्थी पालकांना शासकीय दाखल्यांसाठी अडचणी येऊ नयेत त्याकरिता शासकीय दाखले वाटप, रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असे अनेक सामाजिक उपक्रम घारे यांच्या माध्यमातून राबविले जातात. 

चौकट :

नागरिकांच्या आरोग्याची काळजी 

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार फैलावतात. त्यामुळे नागिकांच्या सुरक्षेसाठी सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ राबविले जात आहे. नागिकांचे आरोग्य सदृढ आणि सुरक्षित राहिले पाहिजे, साथीच्या आजारांना आळा बसला पाहिजे, शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि सोसायट्यांचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे या सामाजिक भावनेतून राबविण्यात येत असलेल्या अभियानाचे नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. 

कोट : 

कर्जत खालापूर तालुक्यात पावसामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई पसरुण्याचा धोका आहे. त्यामुळे लोक आजारी पडू नयेत, त्यांचे आरोग्य चांगले रहावे या भावनेतून कर्जत, खोपोली, नेरळमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान राबविण्यात येत आहे. खोपोलीतील अभियान आता पूर्ण होत आले असून कर्जतमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे, आता नेरळमध्ये देखील आम्ही हे अभियान सुरु करणार आहोत. 

  • सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद. 

 

Friday, July 26, 2024

आमदार थोरवेंनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कर्जतमध्ये पूराचे पाणी - सुधाकर घारे यांचा आरोप, बंधारा न काढल्यास आंदोलनाचा इशारा



कर्जत, दि. 26 जुलै, वार्ताहर: गेले काही दिवस कर्जत परिसरात मुळसधार पाऊस पडत असून उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे. बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरात पूराचे पाणी घुसले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून उल्हास नदीवर प्रतिपंढरपूर आळंदी परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कर्जत जलमय झाल्याचा आरोप करत हा बंधारा हटवण्यात यावा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे.

गेले काही दिवस कर्जत परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अशातच उल्हास नदीपात्राचे पाणी कर्जत शहरात घूसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गुरुवारी कर्जत शहरातील पाण्याची पाहणी घारे यांनी केली, आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना सुधाकर घारे म्हणाले, कोतवाल नगरला लागून उल्हास नदी आहे, येथे गेल्या काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शहरात घुसले. कर्जत शहतून येणारे मुख्य गटाराच्या खालच्या बाजूला बंधारा बांधला आहे. या गटारातून येणारा कचरा, घाण बंधाऱ्यात साचून रोगराई देखील पसरण्याचा धोका आहे.

या बंधाऱ्यामुळे पूराचे पाणी शहरात घुसून नागरिकांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे हा बंधारा पाडण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील घारे यांनी यावेळी दिला आहे.

चौकट :

बंधारा बाधणाऱ्यांवर कारवाई करा, घारेंची मागणी !

सुधाकर घारे म्हणाले, हा बंधारा नागरिकांची कोणतीही मागणी नसताना बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे पूराचे पाणी गटारे नाल्यांमधून कर्जतमध्ये घूसते पुराचे पाणी घरात घुसले तर नागरिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा बंधारा मंजूर केला, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. येथे राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरात पाणी जावू नये याची दक्षता प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे असे देखील घारे यावेळी म्हणाले.

Thursday, July 25, 2024

Akums Drugs and Pharmaceuticals Limited’s Initial Public Offer to open on July 30, 2024




National, July 25, 2024 (AMN/ SPM): Akums Drugs and Pharmaceuticals Limited (“AKUMS” or “The Company”), shall open the Bid / Offer Period in relation to its initial public offer of the Equity Shares (“Offer”) on Tuesday, July 30, 2024.

The Offer comprises a fresh issue of such number of Equity Shares (face value ₹ 2 each) by the Company aggregating up to  ₹ 6,800 million (the “Fresh Issue”) and offer for sale of up to 17,330,435 Equity Shares (“Offered Shares”) by certain existing shareholders of the Company (the “Selling Shareholders”). The Offered Shares comprises up to 1,512,000 Equity Shares by Sanjeev Jain, up to 1,512,000 Equity Shares by Sandeep Jain, (collectively, the “Promoter Selling Shareholders”) and up to 14,306,435 Equity Shares by Ruby QC Investment Holdings Pte. Ltd. (The “Ruby QC” or “Investor Selling Shareholder”) (such offer for sale of the Equity Shares by the Selling Shareholders, the “Offer for Sale”). Ruby QC is backed by Quadria Capital, a prominent healthcare focused private equity fund in Asia.


This Offer includes a reservation of up to such number of Equity Shares aggregating up to ₹ 150.00 million (₹ 15.00 crore) for subscription by eligible employees. (the “Employee Reservation Portion”


The Anchor Investor Bid/Offer Period opens and closes on Monday, July 29, 2024. The Bid/Offer Period will open on Tuesday, July 30, 2024 for subscription and close on Thursday, August 1, 2024. (“Bid Details”)


The Price Band of the Offer has been fixed at ₹ 646 to  ₹ 679 per Equity Share (the “Price Band”). Bids can be made for a minimum of 22 Equity Shares and in multiples of 22 Equity Shares thereafter. (the “Minimum Bid Lot”). 


The Company proposes to utilise the Net Proceeds from Fresh Issue of Equity Shares by the Company towards (i) Repayment/ prepayment of indebtedness of the Company; (ii) Repayment/ prepayment of indebtedness of its Subsidiaries namely, Maxcure Nutravedics Limited and Pure and Cure Healthcare Private Limited; (iii)Funding incremental working capital requirements of the Company; (iv) Pursuing inorganic growth initiatives through acquisitions; and (v) General corporate purposes. (the “Objects of the Offer”).


This Equity Shares are being offered through the Red Herring Prospectus of the Company dated July 24, 2024 filed with the Registrar of Companies, Delhi and Haryana at New Delhi.  (The “RHP”) 


The Equity Shares to be offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the stock exchanges being BSE Limited (“BSE”) and National Stock Exchange of India Limited (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”). For the purposes of the Offer, NSE is the Designated Stock Exchange. (the “Listing Details”)


The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (“SEBI ICDR Regulations") and in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein not less than 75% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (“QIBs”) (“QIB Portion”), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price (“Anchor Investor Portion”), in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion

Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors) including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. 

Further, not more than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders out of which (a) one third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹200,000 and up to ₹1,000,000; and (b) two third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹1,000,000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not more than 10% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders, in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount (“ASBA”) process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID (in case of UPI Bidders) (as defined hereinafter), in which case the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks (“SCSBs”) or under the UPI Mechanism, as applicable to participate in the Issue. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion of the Offer through the ASBA process. For details, see “Offer Procedure” on page 472 of the RHP.


ICICI Securities Limited, Axis Capital Limited, Citigroup Global Markets India Private Limited and Ambit Private Limited are the book running lead managers to the Offer (“BRLMs”). 

All capitalised terms used herein but not defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.


Monday, July 1, 2024

राज्याच्या प्रगतीला अजितदादांचा बुस्टर -अतिरिक्त अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, पर्यटन, गुंतवणूक, उद्योगांवर भर


मुंबई, प्रतिनिधी (आदर्श महाराष्ट्र): राज्याच्या विकासाची नस जाणणारा माणूस, कामाचा माणूस, प्रशासनावर वचक असणारा माणूस, राज्याच्या आर्थिक सुधारणेला गती देणारा नेता अशी ओळख असलेलं नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते.

शुक्रवारी (दि.२७) रोजी अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून १० वा अर्थसंकल्प सादर केला.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, युवा अशा घटकांचा आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प मांडत असताना राज्याच्या प्रगती आणि विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्या. 

अजितदादा पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांचा आणि विकासाचा एक प्रमुख चेहरा आहेत.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रीत करुन राज्याच्या प्रगतीचा वेग साधला आहे.

त्यांनी नुकत्याच मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात देखील त्यांच्या नेतृत्वाची छाप दिसून येते. 

महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीसाठी अनेक योजना आणि घोषणा त्यांनी या अर्थसंकल्पातून केल्या आहेत.  

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख शहरांच्या वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेऊन या वर्षात ३७ किलोमिटर लांबीच्या मेट्रो मार्गिका  वाहतुकीसाठी खुल्या करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

मुंबईतील शिवडी- वरळी जोड रस्त्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा अजितदादा यांनी केली आहे. 

मुंबईला लागून असणाऱ्या ठाणे शहरासाठी ठाणे किनारी मार्ग (कोस्टल रोड) मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. 

हा मार्ग १३.४५ किलोमिटर लांबीचा असून ३ हजार ३६४ कोटी रुपये किंमतीचे हे काम आहे. 

शहरी भागातील रस्त्यांचा विचार करत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील ४ हजार १९७ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. 

तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पुढील ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. 

ग्रामीण भागातील दुर्गम भाग, वाड्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अनेक योजना राज्यसरकार राबवत आहे.

त्यापैकी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेसाठी १ हजार ४०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 

संत सेवालाल महाराज जोडरस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोडरस्ते योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्याची घोषणा अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. 

राज्यात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारवाढीला चालणा देण्यासाठी थ्रस्ट सेक्टरमध्ये अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, त्याव्दारे ५० हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील महापे येथे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यात २ हजार सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा समावेश असणार आहे. 

त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून जवळपास १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. 

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाव्दारे पाच वर्षात (सन २०२८) पर्यंत २५ हजार कोटींची गुंतवणूक करुन ५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

हरित हायड्रोजमध्ये २ लाख ११ हजार ४०० कोटींची गुंतवणूक आणि ५५ हजार ९०० रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. 

- सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय पाणबूडी प्रकल्प 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारण्याची घोषणा

अजितदादांनी अर्थसंकल्पात केली आहे. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून या केंद्रामुळे जवळपास ८०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

त्याच प्रमाणे वेंगुर्ला येथे ६६ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय पाणबूडी प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे. 

- सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना

पश्चिम घाटाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ३८१ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. 

शिवकालीन १२ किल्ल्यांचा जागतिक नामांकनासाठी प्रस्ताव

जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन १२ किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला असून, 

कोकणातील कातळशिल्पे, पंढरीची वारी, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सवाबाबतचे प्रस्ताव देखील युनेस्कोकडे पाठविण्यात येणार आहेत. 

- स्मारके आणि इतर

नागपूर जिल्ह्यातील पावडदौना येथे अध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी स्मारकासाठी ७७ कोटी रुपयांचा विकास आराखडा करणार. 

कल्याण-नगर मार्ग माळशेज घाटात अत्याधुनिक व्ह्युईंग गॅलरी उभारणार.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेथे ज्ञानेश्वरीची रचना केली त्या नेवासा मंदिर परीसराचा विकास आराखडा करणार. 

कोल्हापूरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारणार

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्ली येथे संत श्री रुपलाल महाराजांचे समाधीस्थळ येथे स्मारक उभारणार

आदिवासी कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हतगड (ता. सुरगाणा) येथे कलादालन स्थापन करणार.

Friday, June 21, 2024

ईकेए (EKA) मोबिलिटीने मित्‍सुई अँड कं. लि.कडून दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूकीची घोषणा केली


मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र)-
 ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स)ने घोषणा केली की, औद्योगिक नाविन्‍यतेप्रती योगदानाचा संपन्‍न इतिहास असलेली जागतिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपनी मित्‍सुई अँड कं. लि. (''मित्‍सुई'') ने सुरूवातीला घोषणा केलेल्‍या टप्‍प्‍याटप्‍प्‍याने गुंतवणूक करण्‍याचा भाग म्‍हणून दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूक केली आहे, ज्‍यामुळे झपाट्याने विकसित होत असलेल्‍या इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) कंपनीप्रती त्‍यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. ही धोरणात्‍मक गुंतवणूक भांडवल खर्च (कॅपेक्‍स) आणि खेळत्‍या भांडवलासाठी वापरण्‍यात येईल, ज्‍यामुळे ईकेए मोबिलिटीच्‍या ईव्‍ही क्षेत्रातील सातत्‍यपूर्ण विस्‍तारीकरण व नाविन्‍यतेला पाठिंबा मिळेल. हा टप्‍पा कंपनीसाठी लक्षवेधक मूल्‍यांकन बेंचमार्क स्‍थापित करतो, ज्‍यामधून ईकेए झपाट्याने करत असलेली वाढ दिसून येते.  

डिसेंबर २०२३ मध्‍ये ईकेए, मित्‍सुई आणि व्‍हीडीएल ग्रुप यांनी धोरणात्‍मक दीर्घकालीन सहयोग केला, ज्यामध्‍ये भारतात आघाडीची जागतिक ओईएम निर्माण करण्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (जवळपास ८५० कोटी रूपये) संयुक्‍त गुंतवणूक, इक्विटी आणि तंत्रज्ञान सहकार्याचा समावेश होता. हा जागतिक स्‍तरावरील नवीन मोबिलिटी विभागातील सर्वात मोठा व सर्वात महत्त्वपूर्ण सहयोग आहे. या सहयोगांतर्गत ईकेए मोबिलिटीला मित्‍सुईकडून मोठ्या प्रमाणात धोरणात्‍मक गुंतवणूका मिळतील, तसेच आघाडीची डच तंत्रज्ञान व उत्‍पादन कंपनी व्‍हीडीएल ग्रुपकडून तंत्रज्ञान साह्य व इक्विटी सहयोग मिळेल. या सहयोगाचा भाग म्‍हणून व्‍हीडीएल ग्रुपची उपकंपनी आणि युरोपमधील इलेक्ट्रिक बसेस् व कोचेसमधील अग्रगण्‍य कंपनी व्‍हीडीएल बस अँड कोच ईकेए मोबिलिटीला तंत्रज्ञान हस्‍तांतरित करत भारतातील बाजारपेठेसाठी भारतात इलेक्ट्रिक बसेस् उत्‍पादित करण्‍यास साह्य करेल.  

या वर्षाच्‍या सुरूवातीला मित्‍सुईने ईकेएमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात गुंतवणूक केली, ज्‍यामुळे कंपनीला देशामध्‍ये इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍स, नवीन उत्‍पादन विकासासाठी सर्वात मोठे आरअँडडी केंद्र स्‍थापित करता आले, तसेच कंपनी आपली निर्यात उपस्थिती देखील वाढवत आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूक ईकेए मोबिलिटीच्‍या उत्‍पादन क्षमतांना साह्य करेल, नवीन उत्‍पादन विकासाला गती देईल, बाजारपेठ पोहोच वाढवेल आणि खेळते भांडवल प्रदान करेल. ही गुंतवणूक दैनंदिन कार्यसंचालने, सप्‍लाय चेन ऑप्टिमायझेशन आणि बाजारपेठ विस्‍तारीकरण उपक्रमांना पाठिंबा देण्‍यासाठी कंपनीचा आर्थिक पाया भक्‍कम करेल. 

''आम्‍हाला या दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूकीच्‍या माध्‍यमातून ईकेए मोबिलिटीसोबत आमचा सहयोग दृढ करण्‍याचा आनंद होत आहे,'' असे मित्‍सुईच्‍या मोबिलिटी बिझनेस युनिट १ चे उप डेप्‍युटी जनरल मॅनेजर श्री. हिरोशी ताकेची म्‍हणाले. ''ईकेए मोबिलिटीने ईव्‍ही क्षेत्रात प्रबळ वाढ व नाविन्‍यता दाखवली आहे आणि आम्‍हाला त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण यशाला पाठिंबा देण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही मित्‍सुईच्‍या जागतिक नेटवर्कचा फायदा घेत ईकेएच्‍या स्‍पर्धात्‍मक उत्‍पादनांच्‍या परदेशी बाजारपेठांमधील निर्यातीला गती देण्‍यास उत्‍सुक आहोत. ही गुंतवणूक मित्‍सुईच्‍या शाश्‍वत व भविष्‍यकालीन उद्योगांवरील धोरणात्‍मक फोकसशी संलग्‍न आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की ईकेए मोबिलिटी भावी परिवहनासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावेल.'' 

भारतातील पुणे येथे मुख्‍यालय असलेली ईकेए व्‍यावसायिक इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच ७ मीटर, ९ मीटर व १२ मीटर कॅटेगरीजमध्‍ये इलेक्ट्रिक बसेस, इंटरसिटी कोचेसची श्रेणी आणि इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्‍सची श्रेणी विकसित करत आहे. ईकेए भारत सरकारच्‍या ऑटो पीएलआय धोरणांतर्गत मान्‍यता असलेल्‍या कमर्शियल वेईकल उत्‍पादकांपैकी देखील एक आहे. मित्‍सुईच्‍या नवीन गुंतवणूकीमधून ईकेए मोबिलिटीचा दृष्टिकोन, तंत्रज्ञान व बाजारपेठ क्षमतेमधील तिचा आत्‍मविश्‍वास दिसून येतो.  

ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स)चे संस्‍थापक डॉ. सुधीर मेहता यांनी मित्‍सुईचे सातत्‍यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, ''आम्‍ही ईकेए मोबिलिटीमध्‍ये अविरत आत्‍मविश्‍वास दाखवण्‍यासोबत शाश्‍वत गुंतवणूक करण्‍यासाठी मित्‍सुई आणि व्‍हीडीएल ग्रुपचे आभार व्‍यक्‍त करतो. हा सातत्‍यपूर्ण गुंतवणूक पाठिंबा आम्‍हाला आमच्‍या विकासाला गती देण्‍यास, बाजारपेठेत झपाट्याने नाविन्‍यपूर्ण ईव्‍ही सोल्‍यूशन्‍स आणण्‍यास आणि शाश्‍वत व हरित परिवहन इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती आमचे मिशन दृढ करण्‍यास सक्षम करेल. आम्‍ही मित्‍सुई आणि व्‍हीडीएलसोबत दीर्घकालीन व यशस्‍वी सहयोगासाठी उत्‍सुक आहोत.'' 

कंपनीचा ऑर्डर बुक १००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस् आणि ५००० हून अधिक इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्‍सपर्यंत वाढला आहे. दिल्ली व बृहन्‍मुंबईमध्‍ये ईकेए बसेसना मिळालेला व्‍यापक प्रतिसाद पाहता पुढील काही महिन्‍यांत इलेक्ट्रिक बस ऑर्डर्समध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे आणि कंपनी त्‍याची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या स्थित आहे.    

================================================

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने ब्रँड एंडोर्सर म्हणून उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याची निवड


भारतीय खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेचे संपूर्ण दर्शन घडविण्याकरिता लवकर मदत उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या नीतीमत्तेचा पुरस्कार

आजच्या तरुणांचा रोलमॉडेल, सुमीतचे बँकेला आगामी पिढ्यासोबत जोडण्यासाठी साह्य

मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, बँक ऑफ बडोदा (बँक)च्या वतीने उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याला आपला ब्रँड एंडोर्सर म्हणून करारबद्ध केले आहे. जागतिक स्तरावर सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या बँकेच्या दीर्घकालीन तत्वज्ञानाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले. 

सुमीत नागल या 26 वर्षीय खेळाडूची धोरणात्मक निवड तरुणाई आणि ग्राहकांच्या नवीन पिढीला लक्ष्य करण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादन श्रेणीसह करण्यात आली. 

सध्या भारतीय एकेरी टेनिस खेळात सुमीतने कारकिर्दीतील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकात स्थान मिळविताना 17 जून 2024 रोजी #71 क्रमांक पटकावला. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये ग्रँड स्लॅम पुरुष एकेरी सामन्यात मानांकित खेळाडूला पराभूत करणारा सुमीत हा मागील 35 वर्षांमधला पहिला भारतीय खेळाडू ठरला. 

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांचा समावेश असलेल्या बँक ऑफ बडोद्याच्या एंडोर्सर यादीत सुमीत सामील झाला आहे.. 

या संघटनेबद्दल भाष्य करताना, बँक ऑफ बडोदा’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ देबदत्त चंद म्हणाले, "बँक ऑफ बडोदा’ला भारतातील काही सर्वात आशादायक क्रीडा प्रतिभांशी भागीदारी करण्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाठिंबा देण्याचा समृद्ध वारसा आहे. बँक ऑफ बडोदा कुटुंबात सुमीत नागलचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. टेनिस हा एक जागतिक, अत्यंत स्पर्धात्मक आणि मागणी असलेला खेळ आहे. यामुळे सुमीतचा प्रवास आणि त्याचे ईप्सित अधिक प्रेरणादायी आणि विलक्षण बनते. बँक ऑफ बडोदा, तसेच सुमीत यांच्यातील सहकार्य भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बँकेला तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल".

"सुमीतची बांधिलकी, चिकाटी, उत्कटता आणि प्रामाणिकपणा ही काही वैशिष्ट्ये आहेत. जी बँक तत्त्वज्ञानाला परिभाषित करतात; ही मूल्ये बँक ऑफ बडोद्यालाही प्रिय आहेत. 2024 हे वर्ष आधीच सुमीतसाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे आणि सुमारे 80,000 हून अधिक बडोदा कर्मचारी सुमीतचा जयजयकार करत आहेत. कारण तो आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी आणि देशाला अभिमान वाटेल असा प्रयत्न करत आहे", असे चंद म्हणाले. 

सुमीत नागल म्हणाला, "बँक ऑफ बडोदा’शी भागीदारी हा माझा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. बँक ऑफ बडोदा ही एक आघाडीची, विश्वासार्ह भारतीय वित्तीय सेवा संस्था आहे जी लाखो लोकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा बळकट करते आणि मी या सहकार्याची आतुरतेने वाट पाहत आहे.” 

दिनांक 16 ऑगस्ट 1997 रोजी जन्मलेल्या सुमीतने वयाच्या 8 व्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्याने 2015 विम्बल्डन मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये 3 वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचणारा सुमीत हा पहिला भारतीय आहे. युरोपमध्ये 2 एटीपी चॅलेंजर एकेरी विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. अलीकडेच, एप्रिल 2024 मध्ये, सुमीत हा मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणारा 49 वर्षांनंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 64 व्या फेरीत माटेओ अर्नाल्डीला पराभूत करून मातीवर मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. 

================================================

फिलिपिन्स का ठरतंय महत्त्वाकांक्षी डॉक्टरांकरिता आगामी काळातील मोठे डेस्टीनेशन:श्री. कॅडविन पिल्लई, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे संचालक आणि किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकादमीचे अध्यक्ष

मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र): जागतिक आरोग्य सेवा क्षेत्राला अभूतपूर्व आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पात्र वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, 2030 पर्यंत जगभरात 15 मिलियनहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. अमेरिका आणि कॅनडासारख्या पारंपरिक गंतव्यस्थानांमध्ये वैद्यकीय शाळेच्या जागांसाठी स्पर्धा अभूतपूर्व उंची गाठत आहे. सुमारे 10,000 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 44.5 आरोग्य व्यावसायिकांची किमान आवश्यकता साध्य करण्यासाठी भारताने सुमारे 2 दशलक्ष अधिक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची भर घालण्याची गरज असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. 

संख्या जोडणे ही एक साधी अपेक्षा आहे. परंतु ती साध्य करण्याकरिता शिक्षणासाठी औपचारिक मार्ग असणे आवश्यक आहे. या संदर्भात फिलिपिन्स एक उदयोन्मुख तारा म्हणून उदयास आला आहे. हे आग्नेय आशियाई राष्ट्र स्पर्धात्मक किंमतीत उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या अद्वितीय संयोजनासह जगभरातील महत्वाकांक्षी डॉक्टरांना आकर्षित करत आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत परवडणारे शिक्षण शुल्क लक्षणीयरीत्या कमी असणे, आंतरराष्ट्रीय करियरमध्ये सुरळीत संक्रमण सुनिश्चित करणारा अमेरिकेशी संलग्न अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निवासी कार्यक्रमांचे मजबूत जाळ्यासह अनेक घटकांमुळे लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 

बहरती शिक्षण व्यवस्था 

अमेरिकेच्या वसाहतवादी काळापासूनचा समृद्ध इतिहास लाभलेल्या फिलिपिन्सने वैद्यकीय शिक्षणात प्रचंड प्रतिष्ठा निर्माण केली आहे. फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (FAIMER) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांना मान्यता देणे हा या व्यवस्थेचा पाया आहे. या मान्यता केवळ शिक्षणाच्या गुणवत्तेची पुष्टी करत नाहीत तर पदवीधरांना जगभरातील वैद्यकीय कारकीर्द करण्यासाठी दरवाजे देखील उघडतात.

शिवाय, फिलिपिन्समध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे. जो जगभरातील विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा ठरतो. या भाषिक फायद्यापायी विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये अखंड संवाद आणि सहकार्य सुलभ करतो. शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो. शिवाय, वैद्यकीय प्रशिक्षणावर भर दिल्यामुळे फिलिपिन्समधील वैद्यकीय शिक्षण वेगळे ठरते. वास्तविक जगाच्या आरोग्यसेवेतील त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करून विद्यार्थी सुरुवातीलाच प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. हा व्यावहारिक दृष्टीकोन केवळ त्यांची वैद्यकीय क्षमताच वाढवत नाही तर भविष्यातील कारकिर्दीसाठी आत्मविश्वास आणि तयारीची भावना देखील निर्माण करतो. 

परवडणारे आणि मूल्य मिळवून देणारे: 

युक्रेन-रशिया संघर्षानंतर, फिलिपिन्स हे महत्वाकांक्षी डॉक्टरांसाठी परवडणारे दीपस्तंभ म्हणून उदयास आले आहे. खरे तर, 15 वर्षांपासून परदेशात एमबीबीएस. शिकण्यासाठी फिलिपिन्स हे सर्वोच्च स्थान राहिले आहे. जगणे आणि वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवडणारी क्षमता हे एक मजबूत कारण आहे. पारंपरिक अंगाने तुलना करता, फिलिपिन्समधले खर्च अल्प वाटतात. फिलिपिन्समधील वैद्यकीय शाळांसाठीचे सरासरी शिक्षण शुल्क खरे तर विद्यार्थ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आकर्षक आणि व्यवहार्य आहे. शिष्यवृत्ती आणि त्यानुसार तयार केलेल्या इतर आर्थिक सहाय्य कार्यक्रमांची उपलब्धता देखील विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यास मदत करते. 

इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांसाठी फिलिपिन्सने स्वीकारलेली धोरणे उत्साहवर्धक आहेत. या धोरणात 54 महिन्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रम आणि एक वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट होती. पूर्वी, फिलिपिन्सने प्री-मेड प्रोग्रामसह 4 वर्षांचा एमडी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला होता. परंतु आता, विद्यार्थ्यांनी 54 महिन्यांच्या अभ्यासक्रमाचे पालन करणे आवश्यक आहे. फिलिपिन्सचा सीएचईडी (फिलिपिन्सच्या समतुल्य उच्च शिक्षण विभाग) आणि पीआरसी (व्यावसायिक नियामक आयोग) परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यमान वैद्यकीय कायद्यांतर्गत एक वर्ष इंटर्नशिपसह या अभ्यासक्रमाचे पालन करण्याची परवानगी देतात.

प्रवेशद्वार ते वैश्विक संधी 

उत्तर अमेरिकेत प्रॅक्टीस करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांसाठी, युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसेंसिंग एक्झामिनेशन (यूएसएमएलई) हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. निवासी पदे सुरक्षित करणे आणि शेवटी अमेरिकेत सराव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पदवीधरांनी (आयएमजी) या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे. युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसारख्या डेस्टीनेशनच्या तुलनेत, यूएसएमएलईच्या यशातील अपवादात्मक ट्रॅक रेकॉर्डमुळे फिलिपिन्स आयएमजीकरिता एक धोरणात्मक निवड म्हणून उदयास येते.

फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांनी सातत्याने युएसएमएलई उत्तीर्ण होण्याचे प्रमाण गाठले आहे. जे अनेकदा जागतिक सरासरीपेक्षा अधिक मानले जाते. उदाहरणार्थ  अलिकडच्या वर्षांत, चरण 1, चरण 2 सीके (क्लिनिकल नॉलेज) आणि चरण 2 सीएस (क्लिनिकल स्किल्स) परीक्षांचे उत्तीर्ण दर अनेक संस्थांमध्ये 90% पेक्षा जास्त झाले आहेत. अशी उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांना कठोर लायसनिंग परिक्षांसाठी तयार करण्यात फिलिपिन्सच्या वैद्यकीय शिक्षणाची परिणामकारकता अधोरेखित करते.

शिवाय, फिलिपिन्सच्या पदवीधरांना अमेरिकेतील निवासी कार्यक्रमांच्या मजबूत जाळ्याचा फायदा होतो. अमेरिका कायमच कौशल्यपूर्ण व्यावसायिकांच्या शोधात असते. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांना फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांमधील पदवीधरांना त्यांच्या निवासी कार्यक्रम स्वीकारण्याचा इतिहास आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरील आणि वैद्यकीय प्रशिक्षणावरील विश्वास प्रतिबिंबित होतो. ज्यामुळे जागतिक वैद्यकीय करियरसाठी एक लॉन्चपॅड म्हणून फिलिपिन्सचे स्थान अधिकच बळकट होते.

फिलिपिन्स कशासाठी? 

भारताचा प्रवास जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने होत असताना, विशेषतः वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यसेवेच्या महत्त्वाला विनाकारण महत्त्व दिले जात आहे असे वाटत नाही. NEET परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची मागणी स्पष्ट आहे. तथापि, सुमारे 12 लाखांहून अधिक पात्र विद्यार्थ्यांसाठी 1 लाखांहून अधिक जागा  उपलब्ध असल्याने भारताच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत दिसते.

मोठे खर्च आणि भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची मर्यादित उपलब्धता यामुळे अनेक इच्छुक परदेशात जातात. जिथे शिक्षण अधिक परवडणारे आहे. विशेषतः परतल्यावर परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण होण्याच्या संदर्भात परदेशातील शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे.

भारताच्या अधिक डॉक्टरांची, विशेषतः ग्रामीण भागातील गरज पूर्ण करण्यासाठी, फिलिपिन्स एक आशादायक सहकारी म्हणून उदयास येत आहे. ज्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील आकांक्षा आणि संधी यांच्यातील दरी भरून निघते. परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी फिलिपिन्स एक आकर्षक उपाय देऊ करते. शिवाय, वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील अलीकडील सुधारणांचा उद्देश परदेशात एमबीबीएससाठी सर्वोच्च डेस्टीनेशन म्हणून देशाचे आकर्षण आणखी वाढवणे हा आहे.

============================================

सुप्रिया लाइफसाइन्सचा उदय: सविस्तर कंपनी प्रोफाईल डॉ सलोनी सतीश वाघ, संचालक, सुप्रिया लाइफसायन्स लि.


मुंबई, 21 जून, 2024 मुलाखत/ (आदर्श महाराष्ट्र):
  डॉ सलोनी सतीश वाघ, संचालक, सुप्रिया लाइफसायन्स लि..

Q. पुढील 5 वर्षांसाठी सुप्रिया लाईफसायन्सचा दृष्टीकोन काय आहे? 

Ans. पुढील पाच वर्षांत आपले उत्पन्न लक्षणीयरित्या वाढवण्याचा आणि आर्थिक वर्ष 27 पर्यंत ते दुप्पट करण्याचा सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडचा मानस आहे. नवीन उत्पादनांचा समावेश करून, नियंत्रित बाजारपेठांमध्ये प्रवेश करून सीएमओच्या संधींमुळे या विस्ताराला चालना मिळेल. आर्थिक वर्ष 25 मध्ये अल्पावधीत 21-22% विक्री वाढीचा अंदाज असून 28-30% चे चांगले EBITDA मार्जिन राखतो. याव्यतिरिक्त, पुढील दोन ते तीन वर्षांत भांडवली खर्चात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा आमचा मानस आहे. जे केवळ अंतर्गत स्रोतांमधून आणि कर्जाचा वापर न करता दिले जाईल.

Q. कंपनीच्या गुंतवणूक योजना काय आहेत? 

Ans. सुप्रिया लाइफसायन्सच्या गुंतवणूक योजना पुढील वर्षांमध्ये प्रचंड विकासाची अपेक्षा करतात. उच्च-मार्जिन असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तार करून आणि आपल्या उत्पादनांच्या ऑफरमध्ये सुधारणा करून तीन वर्षांत आपली विक्री 1000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुप्रिया लाइफसायन्स मुंबईजवळच्या अंबरनाथ येथे एका नवीन सुविधेमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे, जी तयार/फिनिश्ड डोस क्षेत्रातील CMO संधींवर लक्ष केंद्रित करेल. अँटी एन्झायटी, अॅनेस्थेशिया तसेच अँटी डायबेटीस क्षेत्रांना संबोधित करणारी सहा ते सात नवीन संयुगे प्रदान करण्याचा देखील त्यांचा हेतू आहे. 

नवीन मॉलिक्युल पाइपलाइन विकसित करण्यासाठी कंपनीची संशोधन आणि विकासातील (R&D) गुंतवणूक महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, सुप्रिया लाइफसायन्स वाढीस चालना देण्यासाठी कंत्राटी विकास आणि उत्पादन पर्यायांची तपासणी करत असताना अत्यंत नियंत्रित बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहे. सुप्रिया लाइफसायन्स, जे निर्यातीतून 80% पेक्षा जास्त उत्पन्न मिळवते, चीन, दक्षिण अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील मजबूत स्थानाव्यतिरिक्त उत्तर अमेरिकन बाजारपेठेत विस्तार करण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायाने आपल्या अनेक वस्तू अमेरिका आणि युरोपमध्ये आधीच पोहोचवल्या आहेत.

सुप्रिया लाइफसायन्स पुरवठा साखळीची स्थिरता वाढविणे आणि त्याच्या मुख्य API करिता किंमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशन धोरण वापरते.

याव्यतिरिक्त, कंपनीच्या दोन नवीन संशोधन आणि विकास केंद्रांच्या स्थापनेत नावीन्यपूर्णतेबद्दलची बांधिलकी दिसून येतेः एक सध्याच्या लोटे साइटवर प्रॉडक्ट लाईफसायकल मॅनेजमेंटसाठी आणि दुसरे अंबरनाथ येथे नवीन मॉलिक्युल, कंत्राटी विकास आणि विपणनासाठी प्रायोगिक प्रकल्पासह. सुप्रिया लाइफसायन्सने भविष्यातील विकासासाठी रायगड जिल्ह्यातील पेणजवळील इसांबे इंडस्ट्रीयल पार्कमध्ये 80,000 चौरस मीटर जमीन मिळवली आहे. जी त्याची दीर्घकालीन दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन दर्शवते.  

Q. सुप्रिया लाइफसायन्स कोणत्या नवीन विभागांकडे विशेष लक्ष देत आहे?

Ans. दीर्घकालीन यश सुनिश्चित करण्यासाठी, सुप्रिया लाइफसायन्स उत्पादने वाढवण्यावर आणि त्याचा पोर्टफोलिओ विस्तृत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आमचे एनाल्जेसिक/अॅनेस्थेटिक क्षेत्र चांगली कामगिरी करत असताना, इतर विभागांनी किरकोळ घसरण दर्शविली आहे. जसे की उपचारात्मक कामगिरीतील तिमाही बदलांचे वैशिष्ट्य आहे. तथापि, आपली बहुतांश औषधे वाढीचे नमुने दर्शवित आहेत. आपल्या क्षेत्रांना आणखी बळकट करण्यासाठी आपली धोरणात्मक उद्दिष्टे आहेत. अतिरिक्त औषधे जोडून आम्ही सक्रियपणे आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. अँटी एन्झायटी तसेच अँटी डायबेटीस औषधांचा समावेश करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचा विस्तार केला आहे. हा विस्तार विविध वैद्यकीय गरजांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठीचे आमचे समर्पण दर्शवितो. अशा प्रकारे, बाजारपेठेच्या मागण्यांचे सातत्याने मूल्यांकन करून आणि आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नाविन्य आणत, आम्ही सर्व विभागांची कामगिरी वाढवण्याचे, आमच्या भागधारकांसाठी शाश्वत वाढ आणि मूल्य सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.  

Q. पोर्टफोलिओच्या विस्तारासाठी कंपनीची काही योजना आहे का? 

Ans. काही विशिष्ट वस्तू आणि वापरकर्त्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही सक्रियपणे आमच्या उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहोत आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहोत. आम्ही नवीन वस्तू आणि उपचार सुरू करून आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही संपूर्ण उत्तर आणि लॅटिन अमेरिकेत नियामक मंजुरी मिळविण्यासाठी काम करत आहोत. कोणतीही चिंता न करता आमची अलीकडील ANVISA लेखापरीक्षण मंजुरी या उपक्रमांवरील आमचा विश्वास दृढ करते. आम्ही Module E वर 60 ते 70 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ज्यामुळे लवकरच आमची उत्पादन क्षमता 900 KL पर्यंत चौपट होईल. ही वाढ आम्हाला केवळ आमच्या नवीन वस्तूंसाठीच मदत करत नाही, तर यामुळे सहकार्याच्या संधीही निर्माण होतात. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या अंबरनाथ साइटवर नवीन संवेदनाशामक उत्पादनासाठी बॉटलिंग लाइन स्थापित करण्यासाठी आणखी जवळपास 60 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहोत. या उत्पादनाच्या जागतिक बाजारपेठेचे मूल्य 300 दशलक्ष डॉलर्स असल्याने, या विस्तारामध्ये आम्हाला वाढीची आशादायक क्षमता दिसते. 

Q. रासायनिक कंपन्या औषधनिर्मिती क्षेत्रात का प्रवेश करत आहेत? 

Ans. अनेक ठोस बाबी रासायनिक कंपन्यांना भारताच्या औषधनिर्माण व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. उदाहरणार्थ, भारतीय रासायनिक क्षेत्रातील अभूतपूर्व वाढ व्यापक बाजार निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी करते आणि ती सुरूच राहील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणुकीचे एक आकर्षक वातावरण निर्माण होईल. दुसरे म्हणजे, देशांतर्गत मागणीतील वाढ आणि जागतिक रासायनिक वापरामध्ये भारताच्या अपेक्षित योगदानामुळे बाजारपेठेतील फायदेशीर क्षमता निर्माण होते. तिसरे, पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी जगभरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा भारताला फायदा होऊ शकतो, कारण त्याची लक्षणीय रासायनिक उत्पादन क्षमता आहे. 

याव्यतिरिक्त, बदलते जिओ-पॉलिटिक्स आणि लवचिक पुरवठा साखळीची आवश्यकता लक्षात घेता, कंपन्या उत्पादन क्षेत्रात विविधता आणण्याचा विचार करीत आहेत, ज्यामुळे भारताच्या आकर्षणात भर पडते. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक समृद्धीमुळे चालणाऱ्या भारतातील वाढत्या औषधनिर्माण उद्योगात, विशेषतः दीर्घकालीन परिस्थितीवर उपचार करणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रासाठी, लक्षणीय वाढीची क्षमता आहे. भारताची सिद्ध उत्पादन क्षमता, विशेषतः जेनेरिक आणि लसींमध्ये, त्याला जागतिक औषधनिर्माण उद्योगातील प्रमुख सहभागी म्हणून स्थान देते. शिवाय, बौद्धिक संपदा अधिकार (IPR) वातावरणातील प्रगतीमुळे जागतिक औषधनिर्मात्यांना भारतीय बाजारपेठेचे आकर्षण वाढते. ही एकत्रित वैशिष्ट्ये भारताला केवळ औषधांच्या विस्तारासाठी एक आकर्षक बाजारपेठ बनवत नाहीत, तर रासायनिक व्यवसायांना त्यांच्या कामकाजात यशस्वीरित्या विविधता आणण्याची बरीच संधी देखील देतात.

 

Thursday, June 13, 2024

बँक ऑफ बडोदाने केली #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा


बँकेच्या ब्रँड एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांनी केला 
3 विजेत्यांचा सन्मान

 

मुंबई, 13 जून2024 (AMN):  सार्वजनिक क्षेत्रामधल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (बँक) #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. स्पर्धेचा शुभारंभ दर वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाला होतो. ही स्पर्धा आपल्यातल्या सर्वसामान्य दिसणाऱ्यातरीदेखील स्वत:च्या क्षेत्रात सर्व अडथळे पार करतसमाजाच्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना ओळखून त्यांचा सन्मान करते. या स्त्रियांच्या गाथा चिकाटीधैर्य आणि उत्तुंग उत्साहाने भरलेल्या असतातत्यांच्यापासून सर्वांना प्रेरणा मिळते. दिनांक 08.03.2024 ते 20.03.2024 या स्पर्धेच्या कालावधीमध्ये बॅंकेला तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर अनेक एंट्रीज आल्याज्यांच्यामधून सर्विलिंक सिस्टिम्स लि.वडोदराच्या मधु मोतियानीनवी मुंबईतील सनशाइन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका सुश्री परमिता मुझुमदार आणि पुणे येथील हेलिआ ग्लोबल स्कुलच्या एज्युप्रेन्योर अनुष सलामपुरिया या तिघी विजेत्या ठरल्या.

 

या तीन विजेत्यांना भारताच्या क्रीडा जगतातील मान्यवर खेळाडू आणि बँकेच्या एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांच्यासोबत संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली.   

 

चौथ्या वर्षी बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. स्पर्धेतल्या प्रवेशासाठी स्पर्धकांना त्यांच्या जीवनातप्रयत्नांमध्ये तसेच यशामध्ये त्यांच्यासाठी प्रेरणा स्त्रोत ठरलेल्या  आणि त्यांच्या जीवनावर प्रभावी ठसा उमटवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीचा किस्सा सादर करावा लागतो.  

 

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री लाल सिंग म्हणाले, “बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा सर्वसामान्य भासणाऱ्या स्त्रियांच्या असामान्य गाथा शेअर करण्याचा आणि त्यामधून बरेच काही शिकण्याचा एक मंच आहे. स्पर्धेमध्ये स्त्री सबळीकरणाचा सन्मान करुन आणि रुढींना झुगारुन स्त्रियांच्या यशाची पोचपावती दिली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. या सर्व स्त्रिया कौतुकास्पद आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना आपले स्वप्नअपेक्षा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलायला प्रेरणा मिळणार आहे.”

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...