Monday, September 29, 2025

भारतात धोरणात्मक विस्तारीकरण करत स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सने जागतिक अस्तित्व केले बळकट


मुंबई, 29 सप्टेंबर 2025 (AMN): जागतिक पातळीवरील लॉजिस्टिक्स कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सतर्फे (एसजीएल) भारतात पदार्पण केल्याचे घोषणा करण्यात आली असून यावरून धोरणात्मक वाढीसाठीची त्यांची बांधिलकी दिसून येते. हा महत्त्वाचा टप्पा गाठून एसजीएलचे भारतात थेट अस्तित्व निर्माण करण्याचे प्राधान्य दिसून येते आणि यावरून जागतिक पातळीवरील फ्रेट फॉरवर्डर म्हणून असलेले त्यांचे स्थान अधिक पक्के होते.

भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून तिच्या वार्षिक जीडीपी वाढीचा दर 6 ते 7 टक्के आहे. 2075 पर्यंत भारत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल आणि त्याची क्रयशक्ती अमेरिकेपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक व्यापारातील भारताची भूमिका अधिक महत्त्वाची होत असलेल्या या काळात, वाढती परदेशी गुंतवणूक आणि कार्यक्षम, विश्वासार्ह लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सची मागणी लक्षात घेता, एसजीएलकडून भारतातील विस्ताराचे पाऊल टाकण्यात आले आहे.

स्थानिक स्तरावर थेट उपस्थिती निर्माण करून, भारतात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणाऱ्या भारतीय कंपन्यांनाही सेवा देण्यासाठी एसजीएल विशेषतः सक्षम ठरते. भारतातील बदलत्या आर्थिक वाढीशी सुसंगत अशी सानुकूल सोल्यूशन्स देण्याची क्षमता एसजीएलकडे आहे.

भारतातील एसजीएलच्या नव्याने सुरू होणाऱ्या संचालनासाठी भक्कम पायाभरणी करण्यात आली असून, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई येथे तीन कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. मुंबई हे मुख्य कार्यालय असेल. मर्स्क, सीईव्हीए लॉजिस्टिक्स आणि रेन्स लॉजिस्टिक्ससारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली स्थानिक टीम कार्यरत असेल.

स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सचे ग्लोबल सीईओ ॲलन मेलगार्ड म्हणाले, “भारतात अस्तित्व निर्माण करणे ही एसजीएलसाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याची बाब होती. आम्हाला अशा टीमसोबत भारतात प्रवेश करायचा होता जी आमच्या उद्दिष्टांशी, ग्राहक प्रथम या दृष्टीकोनाशी आणि उद्योजकतेच्या भावनेशी सुसंगत असेल. हे साध्य झाल्याने भारतात आमची वाटचाल सुरू करण्यासाठी हे योग्यच वेळ आहे, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही तीन महत्त्वाच्या शहरांमधून संचालन सुरू करत आहोत आणि लवकरच देशभर आमचा विस्तार करण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.”

स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्स इंडियाचे सीईओ विकास अग्रवाल म्हणाले, “भारतामधील आमचे पदार्पण हे स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्ससाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत ही एक भरपूर संधी असलेली बाजारपेठ आहे. या ठिकाणी वेग, लवचिकता आणि विश्वासार्ह संबंध यांना खूप महत्त्व आहे. आम्ही अशा प्रकारे कंपनीची उभारणी करत आहोत की जी पूर्णपणे लवचिक आणि सक्षम असेल, ज्यामुळे आम्ही ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार झपाट्याने निर्णय घेऊ शकू आणि त्यांना योग्य सोल्यूशन्स वेळेवर देऊ शकू.”

जागतिक पातळीवरील विस्ताराची पुढची पायरी
एसजीएलचा भारतातील विस्तार हा त्यांच्या जागतिक पातळीवर वाढ करण्याच्या धोरणाचा नैसर्गिक पुढचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात, ब्राझीलमधील ब्लू ब्राझिल, इटलीमधील फोपियानी शिपिंग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स आणि कॅनडामधील आयटीएन लॉजिस्टिक्स यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिग्रहण करून एसजीएलने आपले अस्तित्व अधिक बळकट केले आहे.भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत, जिथे आंतरराष्ट्रीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत आहेत आणि पुरवठा करत आहेत, अशा बाजारपेठेत संचालन सुरू करणे ही पुढची धोरणात्मक पायरी ठरते. स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांची टीम आणि जागतिक पातळीवरील सेवा उपलब्ध करून देत एसजीएल इंडियातर्फे प्रोजेक्ट लॉजिस्टिक्स आणि ह्युमॅनिटेरियन लॉजिस्टिक्स यामधील विशेष कौशल्यांसह एक सुसंगत आणि सर्वसमावेशक सोल्यूशन्स पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
===========================================================================================================================================

एनयूसीएफडीसी आणि सीएससी एसपीव्ही यांच्यात नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार


मुंबई, 28 सप्टेंबर 2025 (AMN):
भारतातील नागरी सहकारी बँकांची (UCBs) शिखर संस्था असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनयूसीएफडीसी) या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीएसी एसपीव्ही) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.

नागरी सहकारी बँकांना सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरने सक्षम करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आधार-आधारित ई-केवायसी, ई-साइन, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स, डिजिलॉकर इंटिग्रेशन, ई-स्टॅम्प सेवा, क्लाउड होस्टिंग, डेटा सेंटर व्यवस्थापन आणि सायबरसुरक्षा उपाययोजना यांचा समावेश असेल. पुढील टप्प्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग, किऑस्क-आधारित सेवा आणि डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्स सुरू करण्यात येतील.

एनयूसीएफडीसी आपल्या सदस्य यूसीबींमध्ये या उपक्रमाचा स्वीकार सुलभ करेल, तर सीएससी एसपीव्ही प्लॅटफॉर्म्स, एपीआय आणि ऑपरेशनल सपोर्ट उपलब्ध करून देईल. अंमलबजावणी आणि क्षमता विकासावर देखरेख करण्यासाठी संयुक्त गव्हर्नन्स टीम काम करेल. करारामध्ये प्रशिक्षण, अनुपालन सहाय्य, तक्रार निवारण आणि डेटा संरक्षण उपाययोजनांचाही समावेश आहे. यूसीबींमधील संस्थात्मक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी लागू असलेल्या नियामक नियमांशी सुसंगतता साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हा सामंजस्य करार मुंबईत एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी आणि सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री. भगवान पाटील यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या करण्यात आला.

या भागीदारीबद्दल एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी म्हणाले, “नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राने आपल्या पारंपरिक पायाभूत स्वरूपासोबत आता डिजिटल युगात झेप घेणे आवश्यक आहे. ही भागीदारी यूसीबींना भविष्यातील गरजांसाठी सज्ज असे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्या लाखो ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, पारदर्शकतेने आणि नियमांचे पालन करून सेवा देऊ शकतील. आर्थिक समावेशन आणि विश्वास हे क्षेत्राच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरत असताना ही भागीदारी यूसीबींना आधुनिकीकरण आणि आव्हानसक्षमतेच्या मार्गावर ठामपणे उभे करते.”

सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री भगवान पाटील म्हणाले, “सीएससी एसपीव्हीची डिजिटल पायाभूत रचना आणि एनयूसीएफडीसीचा संस्थात्मक अधिकार एकत्र येऊन नागरी सहकारी बँकांच्या परिवर्तनासाठी एक बळकट तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करतात. आम्ही एकत्रितपणे अशा उपाययोजना देऊ ज्या व्यापक प्रमाणावर लागू करता येतील. या उपाययोजनांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्र मजबूत होईल आणि लास्ट-माइल सिटिझन्ससना बँकिंग सेवांचा तितक्याच सोयीस्करपणे अनुभवता येतील. हा उपक्रम म्हणजे डिजिटल भारतासाठी शहरी सहकारी बँकिंगचे नव्याने कल्पनाचित्र रेखाटणे आहे.”

Thursday, September 18, 2025

मुंबईत रविवारी जैन संघांची एक भव्य रथयात्रा निघणार


मुंबई, (आदर्श महाराष्ट्र वृत्तसंस्था): 
भगवान महावीरांच्या लोकातीत शासनात, आगम आधारित धर्मशास्त्रांप्रमाणे आणि त्यानुसार साधना करणाऱ्या जैन संघांची एक भव्य महामोठी रथयात्रा येत्या रविवार, २१ सप्टेंबर रोजी, दक्षिण मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरून निघणार आहे.मुंबई

मुंबई महानगरामध्ये शास्त्रसंपन्न आणि विधिपूर्वक आराधना यांचे आदर्श प्रस्थापित करणारी ही अनुपम रथयात्रा रविवार सकाळी ८:३० वाजता चंदनबाला जैन संघ, वालकेश्वर येथून प्रारंभ होईल. या भव्य रथयात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमधून आणि मुंबईच्या विविध भागांतून अनेक हजारो भक्तगण दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.

ही रथयात्रा चंदनबाला – श्रीपालनगर – मलबार हिल येथून सुरू होऊन चौपाटी, सुखसागर, गिरगाव, खेतवाडी, सी.पी. टँक मार्गे भुलेश्वरमधील मोतीशा लालबाग जैन मंदिरात समाप्त होईल. त्यानंतर एक विराट धर्मसभा पार पडेल, ज्यामध्ये पूज्य गुरु भगवंत रथयात्रेचे आध्यात्मिक महत्त्व सांगतील आणि आगामी आयोजनाची घोषणा करतील. हजारो श्रद्धाळू एकत्र येऊन सामूहिक भक्ती साधना करतील.

ही रथयात्रा पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने, मुंबईतील विविध संघ व साधकांद्वारे आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा वर्षभर केलेल्या तपश्चर्येची अनुमोदना आणि श्रावक जीवनाच्या वार्षिक कर्तव्यपूर्तीच्या रूपात होणार आहे.

या यात्रेत तपागच्छाच्या सुप्रसिद्ध "सूरिरामचंद्र" समुदायाचे, तसेच सूरिशांतीचंद्र व सिद्धीसूरीजी महाराज यांच्या परंपरेतील पूज्य आचार्यगण, जे सध्या दक्षिण मुंबईत चातुर्मासासाठी विराजमान आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये:

  • परम पूज्य आचार्य देवेश श्रीमद विजय श्रेयांसप्रभसूरीश्वरजी महाराज– प्रसिद्ध प्रवचनकार,
  • आध्यात्मसम्राट परम पूज्य आचार्य देवेश श्रीमद विजय योगतिलकसूरीश्वरजी महाराज,
  •  मधुर प्रवचनकार परम पूज्य आचार्य देवेश श्रीमद विजय हर्षशीलसूरीश्वरजी महाराज,
  • कविहृदय पूज्य आचार्य देवेश श्रीमद विजय मोक्षरतीसूरीश्वरजी महाराज,
  • प्रवचनकार पूज्य आचार्य देवेश श्रीमद विजय हितरत्नसूरीश्वरजी महाराज,
  • तसेच इतर अनेक मुनिवर, आर्यिकाश्रियां आणि ३०० पेक्षा अधिक साधकगण या यात्रेत सहभागी होणार आहेत.हजारो जैन बंधू-भगिनी शासकीय जयघोष करीत, आपल्या श्रद्धेने रथयात्रेमध्ये सहभागी होतील.

रथयात्रेतील काही वैशिष्ट्ये:

  • ५ इंद्रध्वज,
  • ४५ पेक्षा अधिक संघांच्या झांक्या,
  • ३५+ दीक्षितार्थी,
  • श्री नेमिनाथ प्रभू, श्रीपाल–मायना, १०८ पार्श्वनाथ तीर्थ (कोंढवा, पुणे) अशा विविध कलात्मक रचना,
  • १५+ बँड, पुणेरी ढोल,
  • अनेक दुर्मीळ मंडळ्या,
  • १००+ सुवाक्ये घेऊन चालणारे युवक**,
  • ५००+ पाठशाळेतील विद्यार्थी,
  • ७ तीर्थंकरांच्या रथ सजावटी आणि इतर अनेक आध्यात्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये.

या महामोठ्या रथयात्रेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही संपूर्ण यात्रा जैन धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचे पालन करत श्रद्धा व साधनेने युक्त असेल.

या वर्षीचे विशेष आकर्षण:२४ भगवानांच्या पालख्या ज्या पूजनवस्त्र परिधान केलेल्या नवयुवकांच्या खांद्यावर असतील. हे दृश्य संपूर्ण रथयात्रेचे एक अविस्मरणीय रूप ठरेल.

Wednesday, September 17, 2025

जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित



मुंबई, (आदर्श महाराष्ट्र न्यूज- सचिन मुरडेश्वर): 
केअरएज रिपोर्ट नुसार 6.9% बाजारपेठेतील वाट्यासह भारतातील सर्वात मोठी नॉन-ओईएम कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यातदार कंपनी जिनकुशल इंडस्ट्रीज लिमिटेड (JKIPL) ने मंगळवारी आपल्या आगामी 116-कोटी रु. च्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति शेअर 115 रु. ते 121 रु असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या किंमत पट्ट्याच्या उच्च टोकाला कंपनीचे मूल्य सुमारे 464 कोटी रु. इतके ठरते. रायपूरस्थित या कंपनीचा पहिली पब्लिक ऑफरिंग 25 सप्टेंबर रोजी खुली होईल आणि 29 सप्टेंबर रोजी बंद होईल.

या आयपीओ मध्ये 86.35 लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (फ्रेश इश्यू) आणि 10 रु. दर्शनी मूल्याच्या 9.59 लाख पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे.

JKIPL आपल्या फ्रेश इश्यू मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी 72.67 कोटी रु. दीर्घकालीन वाढीव खेळत्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी वापरणार असून उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरली जाईल.

जिनकुशल इंडस्ट्रीजचे प्रवर्तक श्री. अनिल कुमार जैन, श्री. अभिनव जैन, श्रीमती संध्या जैन, श्रीमती तिथी जैन आणि श्रीमती यशस्वी जैन असून ही कंपनी नवीन/सानुकूलित तसेच वापरलेल्या/पुनर्निर्मित केलेल्या कन्स्ट्रक्शन मशिन्सच्या जागतिक बाजारपेठेत निर्यात व्यापारामध्ये कार्यरत आहे. तसेच भारत सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) तर्फे थ्री-स्टार एक्स्पोर्ट हाऊस म्हणून मान्यता प्राप्त आहे.

JKIPL कंपनी हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर्स, मोटर ग्रेडर्स, बॅकहो लोडर्स, सॉइल कॉम्पॅक्टर्स, व्हील लोडर्स, बुलडोझर्स, क्रेन्स आणि डांबरी पॅव्हर्स यांसारख्या कन्स्ट्रक्शन मशिन्सच्या निर्यात व्यापारात विशेष कुशल आहे. कंपनीने यूएई, मेक्सिको, नेदरलँड्स, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि यूके यांसह 30 हून अधिक देशांमध्ये कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यात केली आहेत.

आर्थिक वर्ष 2025 मध्ये JKIPL ने 380 कोटी रु. चे कामकाजातून महसूल उत्पन्न नोंदवले असून यात वार्षिक 59.5% वाढ झाली आहे. आरएचपी नुसार ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड आणि व्हिजन इन्फ्रा इक्विपमेंट सोल्युशन्स लिमिटेड या सूचीबद्ध प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत.

JKIPL भारतातील छत्तीसगड मधील रायपूर येथे 30,000 चौ. फूट क्षेत्रफळ जागेत स्वतःचे पुनर्निर्माण केंद्र चालवते. पुनर्निर्माण प्रक्रिया म्हणजेच दुरुस्ती व नव्याने सुसज्ज पुनर्बांधणी प्रक्रिया करण्याची प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील मापदंडाशी सुसंगत राहतील हे सुनिश्चित करत या केंद्रामध्ये हायड्रॉलिक मोबाईल क्रेन्स, हायड्रॉलिक क्रिम्पिंग मशीन्स, प्लाझ्मा कटिंग सिस्टिम्स, एमआयजी वेल्डिंग मशीन्स, लेथ्स अँड टर्निंग मशीन्स, लाईन बोरिंग मशीन्स, सँड ब्लास्टिंग, एअर कंप्रेसर्स, पेंटिंग डिव्हाइसेस इत्यादी आधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आलेली आहे. 

जीवायआर कॅपिटल ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओसाठीचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) आहे.


Wednesday, June 18, 2025

गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा



शिवोली, १८ जून २०२५ (ए.एम.एन)   –
 गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला, शिवोली सांजाव पारंपारिक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने २४ जून २०२५ रोजी शिवोलीत सांजाव २०२५ साजरा करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा बहुप्रतिक्षित सांस्कृतिक उत्सव शिवोली या चैतन्यशील नदीकाठच्या गावात सेंट अँथनी चर्चसमोर होणार असून तो परंपरा, रंग आणि सामुदायिक भावनेने भरलेल्या मौजेचे आश्वासन देतो.

यंदाच्या उत्सवात माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे; माननीय मत्स्योद्योग मंत्री श्री नीळकंठ हळर्णकर; जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश सी. गावकर; आमदार, शिवोली मतदारसंघ, डिलायला लोबो; आमदार, कळंगुट मतदारसंघ, श्री मायकल लोबो; सचिव पर्यटन, श्री संजीव आहुजा, आयएएस; पर्यटन संचालक, श्री केदार ए. नाईक; व्यवस्थापकीय संचालक, जीटीडीसी श्री कुलदीप आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

*या कार्यक्रमाबद्दल बोलताना पर्यटन संचालक श्री केदार ए. नाईक* म्हणाले, की “शिवोलीतील सांजाव हा गोव्याच्या केवळ उत्साही मान्सून संस्कृतीचा उत्सव नसून हा उत्सव समुदायांना एकत्र बांधणाऱ्या व खोलवर रुजलेल्या परंपरांची आपल्याला आठवण करून देतो. अशा उत्सवांद्वारे, आम्ही समुदाय-केंद्रित पर्यटन अनुभवांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, जे स्थानिक ओळखीचा सन्मान करतात आणि पर्यटकांना आकर्षक अनुभव देतात.”

गोव्याच्या वारशात रुजलेला आणि अतुलनीय उत्साहाने साजरा केला जाणारा, शिवोलीतील सांजाव महोत्सव हा राज्यातील सर्वात विशिष्ट अश्या मान्सून उत्सवांपैकी एक आहे. या वर्षीचा उत्सव भव्य अश्या पारंपारिक बोट परेडने सुरू होईल, जिथे सुंदर सजावट केलेले फ्लोट्स आणि उत्सवी पोशाख परिधान करून लोक सहभागी होतील. दरवर्षीप्रमाणे हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणारी पाण्यातून मनमोहक अशी मिरवणूक निघेल. गोवा पर्यटन देखील बोट परेडमध्ये एक खास डिझाइन केलेली बोट आणि मान्सून मास्कोटसह सहभागी होईल. त्यानंतर, या प्रसंगी खास तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित नृत्य सादरीकरण होईल.

या उत्सवात गोव्यातील पारंपारिक लोकनृत्ये आणि लाईव्ह संगीत देखील सादर केले जाईल, जे राज्यभरातील कलाकारांना एकत्र आणेल. सांस्कृतिक परंपरेचा एक भाग म्हणून, गोव्यातील सांजाव उत्सवांचा वारसा पुढे सुरु ठेवताना विहिरी आणि ओढ्यांमध्ये आनंदाने प्रतीकात्मक उडी घेतली जाईल.

या उत्सवातील इतर आकर्षणांमध्ये दीर्घकाळ चालत आलेले ओझे आणि धाली परंपरा, कोपेल स्पर्धा तसेच आधुनिक चैतन्यशीलतेसह उत्सवाच्या भावनेचे मिश्रण असलेले आकर्षक सादरीकरण समाविष्ट आहे. या वर्षी कार्यक्रमांच्या यादीमध्ये युवा बँड क्ले जार्सचे उत्साही सादरीकरण, जॉनी बी गुड आणि रेझा यांचा एक विशेष संगीतमय कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही तल्लीन करणारा अनुभव देताना, आमच्या समृद्ध व अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रचार करण्याच्या गोवा पर्यटनाच्या वचनबद्धतेची पुष्टी देतो. उत्सवाच्या वातावरणात पारंपारिक रीतिरिवाजांवर प्रकाश टाकून समुदायांना एकत्र आणणे, चिरस्थायी आठवणी निर्माण करणे आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान अधिक मजबूत करणे, हे या उत्सवाचे उद्दिष्ट आहे.

शिवोलीत नदीकाठच्या आकर्षक निसर्गरम्य स्थळी परंपरा आणि एकतेच्या या गतिमान उत्सवात सहभागी होण्यासाठी जनतेला, पर्यटकांना आणि संस्कृतीप्रेमींना आमंत्रित केले आहे

Monday, June 16, 2025

मुंबईच्या आरव अग्रवाल (AIR 10) आणि इश्मीत कौर (AIR 85) यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) अंतर्गत NEET UG 2025 मध्ये यश मिळवले


मुंबई 16 जून 2025 (एएम न्यूज): 
देशातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने अभिमानाने जाहीर केले की नेरुळ, मुंबईच्या आरव अग्रवालने NEET UG 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 10 (AIR 10) मिळवली असून दादरच्या इश्मीत कौरने AIR 85 मिळवली आहे. हे अपूर्व यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शैक्षणिक शिस्तीचे आणि AESL कडून मिळालेल्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. हे निकाल 14 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून जाहीर करण्यात आले.

विद्यार्थी AESL च्या क्लासरूम प्रोग्रामचा भाग होते, जो खास NEET सारख्या कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय AESL द्वारे मिळालेल्या ठोस शैक्षणिक पाया, संकल्पनांची स्पष्टता आणि सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीला दिले.

"या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आकाशचे अत्यंत आभारी आहोत. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक मेंटरिंगमुळे आम्हाला अवघड विषय अल्प वेळेत आत्मसात करता आले. AESL नसते तर हे यश शक्य झाले नसते," असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

AESL चे चीफ अकॅडेमिक आणि बिझनेस हेड डॉ. एच. आर. राव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, "NEET UG 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे अपूर्व यश मिळवले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण मिळवणे हे नक्कीच मोठे यश आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेच नाही, तर त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे आणि आमच्या शैक्षणिक टीमच्या समर्पित प्रयत्नांचेही फलित आहे. आम्ही त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत यशाच्या शुभेच्छा देतो."

NEET ही परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते आणि ती भारतातील सरकारी व खासगी वैद्यकीय (MBBS), दंतवैद्यकीय (BDS) आणि आयुष (BAMS, BUMS, BHMS इ.) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आहे. याशिवाय, परदेशात प्राथमिक वैद्यकीय पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही परीक्षा आवश्यक आहे.

Friday, June 13, 2025

अपोलो नवी मुंबईत सुरु होणार (ICOM) 'इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबोलिजम' लठ्ठपणा अनेक आजाराचे मूळ - डॉ संजय खरे


मुंबई, १३ जून २०२५ 
 (एएम नेटवर्क) : स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी  महत्त्वाचे आहे. अशी माहिती डॉ संजय खरे यांनी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या पार्श्वभूमीवर दिली.  

मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्तस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे असे अपोलो हॉस्पिटल्सचे अरुणेश पुनेथा यांनी सांगितले.

आहार तज्ञ, मनोवैज्ञानिक, फिजिओथेरपिस्ट आणि वेलनेस विशेषज्ञ यांनी सुसज्ज असणारे अपोलोचे क्लिनिक वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर मिसळलेली कोल्ड्रिंक्स यांचा वाढता खप, मोबाईल टीव्ही स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली खूपच कमी करणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत असे

भारतात धोरणात्मक विस्तारीकरण करत स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सने जागतिक अस्तित्व केले बळकट

मुंबई, 29 सप्टेंबर 2025 (AMN):   जागतिक पातळीवरील लॉजिस्टिक्स कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सतर्फे (एसजीएल) भारतात प...