Saturday, August 24, 2024

एआईसी पिनेकल ने इवॉल्यूशनारी को लॉन्च किया: एक महिला केंद्रित कार्यक्रम जो महिला उद्यमियों को सशक्त बनाएगा।



मुंबई, 23 अगस्त, 2024 (AMN): -
एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम को इवॉल्युशनारी वूमन आंत्रप्रेन्योर्स प्रोग्राम लॉन्च करते हुए खुशी हो रही है। यह कार्यक्रम एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम की तरफ से महिलाओं की उद्यमशीलता की भावना को सशक्त बनाने और उसे पोषित करने के लिए डिजाइन की गई नई पहल है। एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम, भारत सरकार के अटल इनोवेशन मिशन (एआईएम)-नीति आयोग द्वारा समर्थित एक अग्रणी इनक्यूबेटर है।

पिनेकल इंडस्ट्रीज द्वारा 2023 में लॉन्च किया गया, इवॉल्युशनारी लैंगिक विविधता को प्रोत्साहित करने और एक समावेशी कार्यस्थल को बढ़ावा देने में सहायक रहा है। इस बहुआयामी कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं को उनकी करियर यात्रा के हर चरण में समर्थन देना, उन्हें वर्कफोर्स में फिर से प्रवेश करने, नए व्यावसायिक उद्यमों का पता लगाने और विभिन्न क्षेत्रों में अपने करियर को आगे बढ़ाने के अवसर प्रदान करना है।

इवॉल्यूशनारी की सफलता और सकारात्मक प्रभाव के आधार पर एआईसी-पिनेकल को विशेष रूप से महिला उद्यमियों के लिए अपनी स्वयं की समर्पित पहल की घोषणा करते हुए गर्व की अनुभूति हो रही है। इवॉल्यूशनारी महिला उद्यमी कार्यक्रम (डब्ल्यूईपी) एक 6 महीने लंबा इनक्यूबेशन कार्यक्रम है, जिसे महिला उद्यमियों को 10 महिला उद्यमियों के सावधानीपूर्वक तैयार किए गए समूह में शामिल होने का एक अनूठा अवसर प्रदान कर प्रोत्साहित करने और समर्थन करने के लिए तैयार किया गया है।

एआरएआई की पूर्व निदेशक रश्मी उर्ध्वेशे, रेलोफाई के सह-संस्थापक और सीटीओ ऋषभ सांघवी, एक्यूइटास टेककॉम के निदेशक डॉ. रिजवान पिंजरी समेत कुछ ऐसे मार्गदर्शक हैं जो महिला व्यापारिक लीडर्स को उनकी उद्यमशीलता यात्रा में मार्गदर्शन करेंगे।

एआईसी-पिनेकल आंत्रप्रेन्योरशिप फोरम के सीईओ सुनील धाड़ीवाल ने कहा, "इस कार्यक्रम का लक्ष्य एक ऐसा विकसित माहौल तैयार करना है जहां महिलाएं उद्यमियों के रूप में उत्कृष्टता प्राप्त कर सकें, इनोवेट कर सकें और नेतृत्व कर सकें। हमारे पिछले समूहों के लिए, हमें विभिन्न क्षेत्रों में महिला उद्यमियों से आवेदन प्राप्त होते रहे हैं। महिला उद्यमियों का प्रतिशत बढ़ाने के लिए, इनक्यूबेटर का ध्यान पहले व्यवहार्य और नए विचारों को सामने लाने पर अधिक है। हमें विश्वास है कि अगर महिला उद्यमी ऐसे विचारों के साथ आती हैं, तो इन्क्यूबेशन प्रबंधकों, एक्सिलेरेटर्स प्रबंधकों और सलाहकारों की हमारी समर्पित टीम उन्हें व्यावसायीकरण करने में सहायता
===============================================

Tuesday, August 13, 2024

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे




- कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल

कर्जत, दि. १३ ऑगस्ट २०२४, वार्ताहर: कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी मंगळवारी (दि.१३) रोजी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन तीन ते चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक लावण्याबाबत आंदोलकांना शब्द दिला.

महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात कर्जत मधील सर्व सामान्य नागरिक आक्रमक झाला आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. भरमसाठ वीज बिल येत आहे. महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करूनही समस्येचे निराकरण झाले नाही. त्यामुळे कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीने साखळी उपोषण सुरु केले आहे.
मंगळवारी सुधाकर घारे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत समस्या मार्गी लावण्याबाबत आपण पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असा शब्द दिला.

यावेळी सुधाकर घारे यांनी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाची दखल घेऊन ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक लावण्यासाठी विनंती केल्याबद्दल संघर्ष समितीचे प्रमुख ऍड. कैलास मोरे साहेब यांनी घारे यांचे आभार मानले.

चौकट

घारे यांचा खासदार तटकरे यांना फोन

सुधाकर घारे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी महावितरणच्या तक्रारींचा पाढाच घारे यांच्यासमोर वाचला. यावेळी घारे यांनी तातडीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना फोन करुन या विषयाची सविस्तर माहिती देत उर्जा मंत्र्यांसोबत बैठक लावण्याची विनंती केली. खासदार तटकरे यांनी देखील उपोषणाची दखल घेत येत्या चार दिवसांत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेऊन वीजेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शब्द दिला.

Thursday, August 1, 2024

कर्जत-खालापूरमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान - सुधाकर घारे यांचा उपक्रम; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन व कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ सुरु असून मंगळवारी (दि.३१) रोजी कर्जत येथील राजमुद्रा चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

कर्जत, 
१ ऑगस्ट, २०२४ (वार्ताहर):   गेल्या काही दिवसांपासून कर्जत-खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत, नेरळ आणि खोपोली या शहरांमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ अतंर्गत जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून, नागरिकांचा या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

सुधाकर भाऊ फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुधाकर घारे यांनी कर्जत-खालापूर तालुक्यात सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ उपक्रम हाती घेतला आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात हे अभियान आता पूर्णत्वाकडे आले असून, कर्जत शहरात मंगळवारी (दि.३०) रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच नेरळ (ता. कर्जत) शहरात देखील सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

कर्जत खालापूर तालुक्यात सुधाकर घारे यांच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्यात कर्जत खालापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई उद्भवते, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूव वाड्या वस्त्यांवर टॅँकरव्दारे पाणी पुरवठा, पावसाळ्यात नागरिकांना ताडपत्री वाटप, विद्यार्थी पालकांना शासकीय दाखल्यांसाठी अडचणी येऊ नयेत त्याकरिता शासकीय दाखले वाटप, रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असे अनेक सामाजिक उपक्रम घारे यांच्या माध्यमातून राबविले जातात. 

चौकट :

नागरिकांच्या आरोग्याची काळजी 

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार फैलावतात. त्यामुळे नागिकांच्या सुरक्षेसाठी सुधाकर घारे यांच्या माध्यमातून सुरक्षित सोसायटी अभियान २०२४ राबविले जात आहे. नागिकांचे आरोग्य सदृढ आणि सुरक्षित राहिले पाहिजे, साथीच्या आजारांना आळा बसला पाहिजे, शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि सोसायट्यांचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे या सामाजिक भावनेतून राबविण्यात येत असलेल्या अभियानाचे नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. 

कोट : 

कर्जत खालापूर तालुक्यात पावसामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई पसरुण्याचा धोका आहे. त्यामुळे लोक आजारी पडू नयेत, त्यांचे आरोग्य चांगले रहावे या भावनेतून कर्जत, खोपोली, नेरळमध्ये सुरक्षित सोसायटी अभियान राबविण्यात येत आहे. खोपोलीतील अभियान आता पूर्ण होत आले असून कर्जतमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे, आता नेरळमध्ये देखील आम्ही हे अभियान सुरु करणार आहोत. 

  • सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद. 

 

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...